माणूस जन्माला आल्यावर नैसर्गिकपणे बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्धावस्थेत जातो. प्रौढावस्था संपली, निवृत्ती आली की, कुटुंबप्रमुख असलेल्या कर्तबगार व्यक्तींची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू होते. शारीरिक दुर्बलता, आर्थिक परावलंबित्व आणि पुढील पिढीशी होणारा विसंवाद यामुळे वृद्धत्व त्या व्यक्तीला, तसेच संबंधितांना त्रासदायक होऊ लागते.
↧