- डॉ. प्रमिला जरग
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते की, तिला आपल्या समोरच्या सारख्याच वाटणाऱ्या दोन किंवा अधिक पर्यायांपैकी एकाचीच निवड करायची असते. अशावेळी आपण ज्येष्ठ व्यक्तींशी सल्लामसलत केली, साधकबाधक बाजू समजून घेतल्या, बराच विचार केला तरी निर्णय घेणे अवघड होते, कारण तो अखेरीस आपल्यालाच घ्यायचा असतो. काही जण अशावेळी तारतम्य वापरण्याचा, होणाऱ्या परिणामांचा व्यवस्थित विचार करण्याचा सल्ला देतात. तरीदेखील अनेक फाटे फुटणाऱ्या रस्त्याच्या टोकावर आल्यावर नेमका कोणता रस्ता योग्य ठिकाणी नेईल हे न समजल्याने कुंठित होऊन दिशाहीन झालेल्या प्रवाशासारखी आपली अवस्था होऊन जाते. अशा अवस्थेत स्वार्थ, हाव, कोणत्या बेसावध क्षणी मनाचा ताबा घेईल, केव्हा चुकीचा निर्णय घेतला जाईल हे समजणे अवघड असते.
याची जाणीव होती, म्हणून एकदा असाच प्रसंग ओढवला असता आमच्या एका ज्येष्ठ विचारवंत सहकाऱ्यांना आम्ही याबद्दल विचारले. तेव्हा ते हसत म्हणाले, 'ते मी नंतर सांगतो. आधी सांगा मी जगात सर्वांत जास्त कोणाला घाबरत असेन?' आम्हाला त्यांच्या प्रश्नाचे मोठे आश्चर्य वाटले. कारण ते स्वत: अत्यंत निःस्पृह आणि परखड म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे ते कोणाला घाबरत असतील, असे कधी वाटले नव्हते. शिवाय त्यांच्या प्रश्नाचा आमच्या समस्येशी काय संबंध असावा याचे आकलन होत नव्हते. त्यामुळे 'नाही, माहीत नाही,' असे आम्ही गोंधळलेल्या मनाने उत्तर दिले. त्यावर ते गंभीरपणे म्हणाले, 'मी घाबरतो फक्त माझ्या स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला' 'म्हणजे?' नकळत आमच्या तोंडून प्रश्न बाहेर पडला. तेव्हा ते म्हणाले, 'काय चांगले, काय वाईट, काय योग्य आणि काय अयोग्य' हे आपली बुद्धीच आपल्याला सांगू शकते. सत् काय अन् असत् कोणते याचे विवरण करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नैसर्गिकपणे असते. तशी ती सर्व सजीवांकडे असते, म्हणूनच एखादे नैसर्गिक संकट येण्याची पूर्वसूचना प्राणी अंतःप्रेरणेने देतात. आपण तर माणसं, आपल्याकडे बुद्धीचे वरदान आहे. मन विकारवश होऊ शकते. परिस्थितीनुसार स्वार्थ, गर्व, अतीव माया अशा अनेक भावनांच्या प्रभावामुळे गैरमार्ग स्वीकारण्यासाठी माणूस विवश होऊ शकतो. पण अशा विचारांनी आपल्या सद्असद् बुद्धीला झाकोळून न टाकण्याची खबरदारी घेऊन निर्णय घेतलात, तर योग्य मार्ग तुमचा तुम्हाला अवश्य मिळेल.'
खरेच एकाच वाटेवर मंदिर असते, तसेच मद्यालय देखील असते. कुठे शिरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. एकच काडी, घरातील चूल पेटवू शकते, देवापुढचे निरांजन उजळू शकते, तीच कुणाचे घरही जाळू शकते. तिच्या सहाय्याने मशाल पेटवून अंधारी वाट उजागर करू शकते. तिचा वापर कसा, कोणत्या मार्गाने करायचा हे मात्र आपणच भावनेच्या आहारी न जाता, विचार, बुद्धी वापरून करायला हवा एवढेच.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते की, तिला आपल्या समोरच्या सारख्याच वाटणाऱ्या दोन किंवा अधिक पर्यायांपैकी एकाचीच निवड करायची असते. अशावेळी आपण ज्येष्ठ व्यक्तींशी सल्लामसलत केली, साधकबाधक बाजू समजून घेतल्या, बराच विचार केला तरी निर्णय घेणे अवघड होते, कारण तो अखेरीस आपल्यालाच घ्यायचा असतो. काही जण अशावेळी तारतम्य वापरण्याचा, होणाऱ्या परिणामांचा व्यवस्थित विचार करण्याचा सल्ला देतात. तरीदेखील अनेक फाटे फुटणाऱ्या रस्त्याच्या टोकावर आल्यावर नेमका कोणता रस्ता योग्य ठिकाणी नेईल हे न समजल्याने कुंठित होऊन दिशाहीन झालेल्या प्रवाशासारखी आपली अवस्था होऊन जाते. अशा अवस्थेत स्वार्थ, हाव, कोणत्या बेसावध क्षणी मनाचा ताबा घेईल, केव्हा चुकीचा निर्णय घेतला जाईल हे समजणे अवघड असते.
याची जाणीव होती, म्हणून एकदा असाच प्रसंग ओढवला असता आमच्या एका ज्येष्ठ विचारवंत सहकाऱ्यांना आम्ही याबद्दल विचारले. तेव्हा ते हसत म्हणाले, 'ते मी नंतर सांगतो. आधी सांगा मी जगात सर्वांत जास्त कोणाला घाबरत असेन?' आम्हाला त्यांच्या प्रश्नाचे मोठे आश्चर्य वाटले. कारण ते स्वत: अत्यंत निःस्पृह आणि परखड म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे ते कोणाला घाबरत असतील, असे कधी वाटले नव्हते. शिवाय त्यांच्या प्रश्नाचा आमच्या समस्येशी काय संबंध असावा याचे आकलन होत नव्हते. त्यामुळे 'नाही, माहीत नाही,' असे आम्ही गोंधळलेल्या मनाने उत्तर दिले. त्यावर ते गंभीरपणे म्हणाले, 'मी घाबरतो फक्त माझ्या स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला' 'म्हणजे?' नकळत आमच्या तोंडून प्रश्न बाहेर पडला. तेव्हा ते म्हणाले, 'काय चांगले, काय वाईट, काय योग्य आणि काय अयोग्य' हे आपली बुद्धीच आपल्याला सांगू शकते. सत् काय अन् असत् कोणते याचे विवरण करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नैसर्गिकपणे असते. तशी ती सर्व सजीवांकडे असते, म्हणूनच एखादे नैसर्गिक संकट येण्याची पूर्वसूचना प्राणी अंतःप्रेरणेने देतात. आपण तर माणसं, आपल्याकडे बुद्धीचे वरदान आहे. मन विकारवश होऊ शकते. परिस्थितीनुसार स्वार्थ, गर्व, अतीव माया अशा अनेक भावनांच्या प्रभावामुळे गैरमार्ग स्वीकारण्यासाठी माणूस विवश होऊ शकतो. पण अशा विचारांनी आपल्या सद्असद् बुद्धीला झाकोळून न टाकण्याची खबरदारी घेऊन निर्णय घेतलात, तर योग्य मार्ग तुमचा तुम्हाला अवश्य मिळेल.'
खरेच एकाच वाटेवर मंदिर असते, तसेच मद्यालय देखील असते. कुठे शिरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. एकच काडी, घरातील चूल पेटवू शकते, देवापुढचे निरांजन उजळू शकते, तीच कुणाचे घरही जाळू शकते. तिच्या सहाय्याने मशाल पेटवून अंधारी वाट उजागर करू शकते. तिचा वापर कसा, कोणत्या मार्गाने करायचा हे मात्र आपणच भावनेच्या आहारी न जाता, विचार, बुद्धी वापरून करायला हवा एवढेच.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट